महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाबद्दल !!
महाराष्ट्राचा भूगोल गडकोटांमध्ये गुंफून शिवछत्रपतींनी या मातीला चिलखत घातले. मराठ्यांच्या इतिहासात गडकोटांना अनन्यसाधारण महत्व आहे. सह्याद्री तल्या या महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाबद्दल रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी आपल्या "मराठी रियासत"च्या पहिल्या खंडाच्या समालोचनेत सुंदर लिहिले आहे.